प.पू. सद्गुरु ॐ मालती देवी
कलियुगात परमेश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग (ध्यानयोग) दाखविणाऱ्या प.पू. सद्गुरु ॐ मालती देवी या अतुलनीय मनोनिग्रह व कठोर साधनेच्या बळावर पूर्णत्वाला पोहोचून त्यांना ‘सद्गुरु’ पद प्राप्त झाले. प.पू. आईंनी एकानाथांप्रमाणे नेटका प्रपंच केला, तर तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ‘ठायीच बसोनी करावा एकचित्त ‘ याप्रमाणे घरीच साधना करून अध्यात्माचे उच्च शिखर गाठले.
Read More
प. पू. आईंनी सांगितलेला ध्यान मार्ग. परमेश्वर या जगात सर्वत्र आहे तसाच तो तुमच्यात सुद्धा आहे. म्हणूनच तो बाहेर कुठेही शोधण्याऐवजी अंतर्मुख होऊन शोध घ्या. आत्मसाक्षात्कार म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय आणि ध्यानयोग हा आत्मसाक्षात्काराचा सुलभ मार्ग आहे. कलियुगात धावपळीच्या जीवनात अर्थार्जनासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कालानुरूप स्त्री व पुरुष दोघांच्याहि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
Read More
संत श्रेष्ठ श्री तुलसीदासांनी ‘रामचरित मानस’ या ग्रंथात साधू- संतांना ‘ जंगम तीरथराजू’ म्हणजे चालते बोलते तीर्थराज म्हणजे प्रयागतीर्थ म्हटले आहे. ‘ तीर्थी कुर्वान्तितीर्थानि’ स्वान्तःस्थे गदाभृता (भगवत) म्हणजे संतांच्या वास्तव्याने तीर्थांना पावन असे ‘ तीर्थत्व प्राप्त होते. संत ज्या ठिकाणी राहतात. ते स्थानच तीर्थ बनते. असेच एक पावन तीर्थ ‘ॐ मालती तपोवन’. मिरज- म्हैसाळरोडवर, मिरजेपासून ७ किलो मीटर अंतरावर ‘ॐ मालती तपोवनाची’ पवित्र वस्तू आहे.
Read More